विहार जोडो अभियान सायकल मार्चला उत्स्फुर्त प्रतिसाद

पंचशिल ध्वज लावून मानवतेचा संदेश देत निघाला मार्च

0

विलास नरांजे, वणी: समता सैनिक दल युनिट वणी व्दारा रविवारी 29 ऑक्टोबरला विहार जोडो अभियान सायकल मार्च काढण्यात आला. याला वणीतील आंबेडकरी जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हा मार्च सकाळी 8 वाजता सम्राट अशोक नगर बुध्द विहारापासुन सुरू झाला. सायकलवर पंचशिल ध्वज लावून हा मार्च वणीतील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – रंगनाथ नगर – लालगुडा – लालगुडा(नवीन) – पंचशिल नगर -छोरीया ले आऊट – वासेकर ले आऊट – भिमनगर – दामले फैल – गायकवाड फैल – मनिषनगर – रवीनगर – विठ्ठलवाडी या मार्गाने जात पुढे रेल्वे स्टेशन कॉलनीमध्ये संध्याकाळी 5 वाजता याचा समारोप झाला.

हा सायकल मार्च समृध्द तेलंग यांच्या नेतृत्वात निघाला. वणीतील बौध्द वस्त्यांमध्ये तथागत बुध्दांच्या मानवतेचा संदेश देव व बुध्दविहार धम्म संस्काराचे केंद्र व्हावे हा संदेश देत फिरला. वस्ती-वस्तीतून या सायकल मार्चचे उत्स्फुर्त स्वागत झाले.

रेल्वे स्टेशन कॉलनीत झालेल्या समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन किशोर चहांदे, तर प्रमुख अतिथी म्हणून नवनाथ नगराळे होते. मार्गदर्शक म्हणुन विलास नरांजे यांनी सायकल मार्चची भुमिका विशद केली. या कार्यक्रमाचे संचालन चंदु परेकर यांनी केले तर लभाने मॅडम यांनी आभार मानले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.