शहराचा श्वास ट्राफिकमध्ये जाम, वाहतुकीला कोण घालेल लगाम

जड वाहतूकीसंदर्भात मानवी हक्क सुरक्षा परिषदेने घेतली दखल

बहुगुणी डेस्क, वणी: तिन्ही तालुक्यातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून वणीचा लौकिक आहे. इथे नेहमीच वर्दळ असते. पर्यायाने वणी शहरात वाहतूक ही फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वणी शहरातील प्रत्येक चौकात वाढत्या अतिक्रमणामुळे ट्राफिक जाम होते.

ही नेहमीची समस्या असून ट्राफिक जाम झाल्यामुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरात भरदिवसा होणारी जड वाहतूक बंद करण्यात यावी. अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने निवेदनातून केली आहे. याबाबतचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक सीता वाघमारे वाहतूक उपविभाग वणी यांना देण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौकात तर दररोज मोठी गर्दी असते. त्यातही दुकानदार आपल्या दुकानांची फलके रस्त्यावर ठेवतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. गांधी चौकातील व्यापाऱ्यांचा माल नेहमी ट्रकने येतो. दररोज अनेक ट्रक माल येतो. हा माल सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत उतरवला जात आहे.

दिवसा जर ट्रक आला तर वणी शहराची वाहतूक व्यवस्था ठप्प होते. त्याचा सामान्य नागरीकांना त्रास होतो. त्यामुळे दिवसा होणारी जड वाहतूक बंद करण्यात यावी. तसेच वणी शहरात सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याकरिता मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक (वाहतूक विभाग) तर्फे निवेदन देण्यात आले.

यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष राजू धावंजेवार, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानघाटे, वणी विधानसभा भाऊसाहेब आसुटकर, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने, यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख सुमित्रा गोडे, वणी तालुका महिला अध्यक्ष, सुनीता काळे, वणी शहर महिला अध्यक्ष प्रमिला चौधरी

सुरेश बन्सोड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य, परशुराम पोटे प्रदेश कार्यकारी सदस्य, वामन कुचनकार प्रदेश कार्यकारी सदस्य, संदीप बेसरकर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य, अमोल कुमरे, मारेगाव तालुका अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्षा मनीषा सु. निब्रड तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

Comments are closed.