बहुगुणी डेस्क, वणी: येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यात भाजपा एकहाती सत्ता मिळवणार असल्याचा दावा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चव्हाण यांनी केला. स्थानिक वसंत जिनिंग हॉलमध्ये मंगळवार दिनांक 29 जून रोजी ‘संकल्प से सिद्धी तक’ अभियानाच्या समारोप झाला. या प्रसंगी त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी ओबिसी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, वणी विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे, माजी महामंत्री रवी बेलुरकर, जिल्हा उपाध्यक्ष नितीन वासेकर, वणी तालुका अध्यक्ष प्रदीप जेऊरकर, शहराध्यक्ष ऍड. नीलेश चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्या मंगला पावडे, वणी तालुका अध्यक्षा मीरा पोतराजे, जयमाला दर्वे, उमा पिदुरकर, संध्या अवताडे, मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, झरी तालुका अध्यक्ष नागेश घुगूल, प्रा.महादेव खाडे, श्रीकांत पोटदुखे, संतोष डंभारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी माजी आमदार संजयरेड्डी बोदकुरवार माजी जिल्हा महामंत्री रवि बेलुरकर यांच्या नेतृत्वात व जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्या उपस्थित विलास डवरे यांनी पक्षात प्रवेश घेतला. मागेल त्याला घरकुल, विशेष म्हणजे अतिक्रमणधारकांनाही घरकुल, वीज, रस्ते, जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नळ, लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना राबविल्यात. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही एकहाती सत्ता मिळवू असे नवनिर्वाचित भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल चव्हाण यांनी सांगितले.
Comments are closed.