विविध उद्योगांचे मोडलेत कंबरडे

तहसीलदार यांच्या मार्फत प्रधानमंत्री यांना दिले निवेदन

0

सुशील ओझा, झरी: केंद्रातील मोदी सरकारने युवकांसाठी वर्षाला २ कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. ते सत्तेवर विराजमान झाले. पण परिस्थिती मात्र वेगळीच आहे. नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म लघू,मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. त्याची परिणिती म्हणजे करोडो रोजगार नष्ट झाले. वस्तू सेवा कराच्या कुटीर व लघू मध्यम क्षेत्राचे आणि उद्योग धंद्याचे पार कंबरडे मोडले.

याचा परिणाम म्हणजे बेरोजगारी मोठ्ठ्या प्रमाणात वाढली. प्रधानमंत्री मोदी यांच्या २० लाख कोटीच्या पॅकेजमधून बेरोजगार युवक, शेतकरी व लघु ,मध्यम उद्योग क्षेत्र यापैकी कोणत्याही घटकास मदत झाली नाही. पंतप्रधान मोदींनी दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासनाला जाणून रोजगार निर्मितीवर लक्ष दिले पाहिजे. मोदी सरकारकडे युवकांनी *रोजगार दो… ही मागणी केली. तसे निवेदन तहसीलदार खिरेकर यांच्यामार्फत प्रधानमंत्री यांना दिले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी वणी विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन टाले, महासचिव  रोहित राऊत, झरी तालुकाध्यक्ष राहुल दांडेकर , शंकर आकुलवार, प्रदीप टेकाम, मयूर टाले उपस्थित होते..

Leave A Reply

Your email address will not be published.