सगणापूरमध्ये थरार… शुल्लक कारणावरुन तरुणावर चाकू हल्ला

एकाने हात पकडले तर दुस-याने केला चाकूने हल्ला

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे एका तरुणावर शुल्लक कारणावरुन चाकू हल्ला केल्याची घटना घडली. मंगळवारी 26 मेच्या सात्री 8.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा नोंद करून मारेगाव पोलिसांनी त्यांना तात्काळ गजाआड केले.

दिनेश सोनबा आत्राम (24) रा. सगणापूर (पोड) येथील रहिवाशी आहे. तो संध्याकाळी गावातील एका पानटपरीवर उभा असताना विलास तुकाराम आत्राम (30) हा त्या पानटपरीजवळ गेला. त्याने विलासला “माझ्या भावाची गाडी का नेली, आणि कुणाला विचारून नेली” अशी विचारणा करत वाद घातला व त्यालात जीवे मारण्याची धमकी देऊऩ निघून गेला.

गावात घडला थरार….
काही वेळाने विलास चाकू घेऊन पानटपरीजवळ आला. तिथे उभ्या असलेल्या दिनेश याचे कबीराज आत्राम (25) याने हात धरून ठेवले तर विलास आत्राम याने दिनेशच्या हातावर, मानेवर चाकू हल्ला केला. हल्ल्यानंतर ते दोघे आरोपीही घटना स्थळावरून पसार झाले.

प्रातिनिधिक फोटो

घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान मारेगाव पोलिसांनी घटना स्थळ गाठून दिनेश आत्रामला ग्रामीण रुग्णालयात भरती केले. फिर्यादीच्या बयानावरून आरोपी विलास आत्राम, कबिराज सोनबा आत्राम याच्या विरोधात कलम 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा नोंद करून यांना तात्काळ अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनात जमादार निलेश वाढई करत आहे.

वणी  बहुगुणी आता टेलीग्रामवर . आपलं चॅनेल (@Wani Bahuguni) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि वणी व परिसरातील  बातम्या आणि  महत्त्वाच्या घडामोडी मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.