अखेर विषबाधा प्रकरणातील पोलीस पाटलांचे निलंबन रद्द

'वणी बहुगुणी' इम्पॅक्ट: प्रशासन नमलं

0
रवि ढुमणे, वणी: विषबाधा प्रकरणाचे खापर कोतवाल आणि पोलीस पाटलांवर फोडत 3 कोतवाल आणि पोलीस पाटलांना निलंबित करण्यात आलं होतं. मात्र अखेर प्रशासनाला नमतं घ्यावं लागलं असून त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. मारेगाव येथील तहसिलदारांनी विषबाधा प्रकरणाचे खापर कोतवाल, पोलीस पाटलावर फोडत त्यांना निलंबित करण्याचा मनमानी कारभार केला असल्याचे वृत्त “वणी बहुगुणी” लावून धरले होते. या वृत्ताची दखल घेत राज्यातील पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी मारेगावात दाखल झाले. या बाबतीत ठाणेदार मारेगाव यांच्याशी चर्चा करून निलंबन मागे घेण्यासाठी निवेदन दिले. अखेर प्रशासन नमले आणि पोलीस पाटलांचे निलंबन रद्द झाले.

 

मारेगाव तालुक्यात चार शेतकरी, शेतमजुरांचा फवारणी दरम्यान मृत्यू झाला होता, तर 70 च्या वर शेतकरी, शेतमजूर बाधीत झाले होते. मात्र या प्रकरणाचं खापर कोतवाल आणि पोलीस पाटलांवर फोडत चिकाटे पाटील मारेगाव, सौ आदेवार पाटील, टाकळी, वनकर पाटील पिसगाव यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली. हे अन्यायकारक प्रकरण ‘वणी बहुगुणी’ने समोर आणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वृत्तमालिका सुरू केली. या वृत्ताची  राज्यातील पोलीस पाटील संघटनेने दखल घेत चक्क मारेगाव गाठले होते.

 

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन यांचे वतीने  राज्याध्यक्ष  मोहनराव शिंगटे यांचे मार्गदर्शनाखाली असोसिएशनचे शिष्टमंडळ यवतमाळ जिल्हयातील मारेगाव तालुक्यातील पोलीस पाटलांशी चर्चा केली. तसेच संबधित अधिकाऱ्याशी भेट घेऊन निलंबन मागे घेण्यासाठी विनंती केली होती.   त्यावरून ठाणेदार मारेगाव यांनी अहवाल सादर केला. या प्रकरणी पोलीस पाटील संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी यवतमाळ यांची भेट घेऊन त्यांना निलंबन रद्द करण्यासंबंधी निवेदन देऊन चर्चा केली. अखेर प्रशासनानं नमतं घेत पोलीस पाटलांचे निलंबन रद्द केले.

 

असोसिएशनच्या वतीने जेष्ट मार्गदर्शक सल्लागार उल्लास मेढे पाटील  कोपरगाव, यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनिल धवने पाटील, राज्यपदाधिकारी दिपक गिरी पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष प्रविण राक्षे पाटील, सातारा जिल्हाउपाध्यक्ष विजय थोरात पाटील, जिल्हामार्गदर्शक  दिपक जगताप पाटील, जिल्हाकार्यकारणी सदस्य ताजुदिन संन्दे पाटील ,कराड दक्षिण तालूका कार्याध्यक्ष राहुल लोंडे पाटील, सदस्य महादेव मंडले पाटील, मारेगवा तालुकाध्यक्ष भाऊराव टेकाम पाटील, पोलीस पाटील निमसरकार, विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संगठणा नागपूर, पोलीस पाटील असोसिएशन राळेगाव,  व इतर तालुक्यातील पोलीस पाटील यांनी सदर प्रश्न लावून धरला होता.

पोलीस पाटील संघटनेने मानेले ‘वणी बहुगुणी’चे आभार

या प्रकरणी पोलीस पाटील संघटनेचे मारेगाव अध्यक्ष भाऊराव टेकाम म्हणाले की…

 वणी बहुगुणीने हे प्रकरण उजेडात आणल्यामुळे राज्यपातळीवर या प्रकरणाची दखल घेतली गेली, अखेर सर्व बाजूने दबाव वाढल्यामुळे प्रशासनाला त्यांचा अन्यायकारक निर्णय रद्द करावा लागला. केवळ प्रकरण लावून धरणेच नाही तर पुढे काय करावे याबाबतही वणी बहुगुणीने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले.  त्यामुळे आम्ही वणी बहुगुणीचे आभार मानत आहोत. सोबतच आम्ही मारेगावचे ठाणेदार अमोल माळवे यांचे ही आभार मानत आहोत. न्याय मिळाल्यामुळे लवकरच आम्ही एक आभाराचा कार्यक्रम देखील आयोजित करणार आहोत.
– भाऊराव टेकाम, तालुका अध्यक्ष पोलीस पाटील संघटना
Leave A Reply

Your email address will not be published.