आता होईल विद्यार्थ्यांनी दिशा निश्चित, आज शनिवारी प्रबोधन कार्यशाळा

प्रदीर्घ अनुभवी प्रा. दिलीप मालेकर व प्रा. वैभव ठाकरे देतील जादुई टिप्स

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिक्षणानंतर पुढं काय? हा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनाही भेडसावतो. नुकतेच इयत्ता 10 वी आणि 12 वीचे निकाल लागलेत. त्यानंतर नेमकी कोणती दिशा पकडावी? कुठल्या अभ्यासक्रमाकडे वळावं असा संभ्रम विद्यार्थी व पालकांनाही असतो. म्हणूच त्यांची समोरील दिशा निश्चित करण्यासाठी राजूर येथे प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 17 मे 2025 रोजी राजुरच्या महिला मंडळ हॉलमध्ये सायंकाळी 6 वाजता हे वर्कशॉप आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव होईल.”विद्यार्थ्यांनी ध्येय कसे निवडावे आणि ते कसे गाठायचे!” या विषयावर प्रा. दिलीप मालेकर, तसेच प्रा. वैभव ठाकरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष राजूर ग्राम पंचायतीच्या सरपंच विद्या डेव्हिड पेरकावार असतील. प्रणिता मो.असलम, हरिहर निमसटकर, प्रकाश तालावर, संजय धोबे, रश्मी क्लासेस, रक्षा वानखेडे, या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रबोधन कार्यशाळा आणि विद्यार्थी गुणगौरव होईल. या प्रबोधन कार्यशाळेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे विनंती राजूर विकास संघर्ष समितीच्या वतीने ॲड. कुमार मोहरमपुरी, महेश लिपटे, राहुल कुंभारे, जयंत कोयरे, सुनीता कुंभारे, नंदकिशोर लोहकरे, पल्लवी धम्मप्रिय, विजय तोताडे, सुनील सातपुते, विनायक येसंबरे, नागो काळे, अमित करमरकर यांनी केली.

Comments are closed.