काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद, मंगळवारी समारोप

जितेंद्र कोठारी, वणी: भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर काँग्रेसतर्फे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनसंवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वणी विधानसभा क्षेत्रात दिनांक 4 सप्टेंबर रोजी झरी येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. झरी, मारेगाव आणि वणी अशा तीन तालुक्याचा दौरा करून या यात्रेचा मंगळवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी वणी येथे समारोप होणार आहे. त्यानिमित्त मंगळवारी दु. 2 वाजता रंगनाथ स्वामी मंदिरातून बाईक रॅली निघणार आहे. तर शेतकरी मंदिरात दु. 4 वाजता समारोपीय कार्यक्रम होणार आहे. यात प्रमुख वक्ते म्हणून काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून वामनराव कासावार यांची उपस्थिती राहणार आहे. समोरोपीय कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पदयात्रेचे मुख्य समन्वयक डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.

महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, पीकविमा, शेतक-यांचे विविध प्रश्न, धार्मिक सलोखा तसेच स्थानिक मुद्दयांबाबत नागरिकांशी संवाद साधण्यासाठी काँग्रेसतर्फे वणी विधानसभा क्षेत्रात जनसंवाद यात्रा काढण्यात आली. दिनांक 4 सप्टेंबर रोजी झरी तालुक्यातून या जनसंवाद यात्रेला सुरूवात झाली. यात्रेने 4 आणि 5 सप्टेंबर या दोन दिवसात मुकुटबन आणि पाटण सर्कलचा दौरा केला. आशिष खुलसंगे व राजीव कासावार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा झाली.

दिनांक 6 सप्टेंबर रोजी यात्रा मारेगाव तालुक्यात पोहोचली. बुधवार व गुरुवारी यात्रेने मार्डी आणि वेगाव या दोन सर्कलमधले अधिकाधिक गावांचा दौरा केला. नरेंद्र ठाकरे, अरुणा खंडाळकर, मारोती गोहोकर, गौरीशंकर खुराणा, अंकुश माफूर इत्यादींची प्रमुख उपस्थितीत ही यात्रा झालाी. तर 8 ते 11 सप्टेंबर पासून ही यात्रा वणी तालुक्यात आहे. वणी सर्कलमधले भालर-लालगुडा, शिंदोला व कायर सर्कलमधल्या विविध गावात ही यात्रा पोहोचली.

रॅलीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद – डॉ. महेंद्र लोढा
जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचता आले. प्रत्येक गावात रॅलीचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. या यात्रे दरम्यान नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या. प्रत्येक गावात कॉर्नर सभा तर मुख्य बाजारपेठेत सभा घेण्यात आली. या यात्रेदरम्यान अनेक गावातील नागरिकांनी पक्ष प्रवेश केला.
– डॉ. महेंद्र लोढा, मुख्य समन्वयक, जनसंवाद यात्रा

दुपारी 2 वाजता बाईक रॅली
वणी येथे सकाळी 2 वाजता रंगनाथ स्वामी मंदिरातून बाईक रॅली निघणार आहे. चिखलगाव, गणेशपूर या गावात पोहोचल्यानंतर दु. 4 वाजता या रॅलीचा शेतकरी मंदिरात समारोप होणार आहे. त्यानंतर शेतकरी मंदिरातच समारोपीय सभा होणार आहे. बाईक रॅली व समारोपीय कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

Comments are closed.