विवाह सोहळ्यांच्या मंगल सनईत ‘कोरोना’चा बेसूर

मंगल कार्यालय, कॅटरिंग, डेकोरेशन व्यवसायिकांचे लाखोंचे नुकसान

0

जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणूमुळे लग्न सोहळ्याचे मंगलमय सूर बेसूर झाले असून, मंगल कार्यालय व लॉन्सचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मंगल कार्यालय व्यवसायाशी निगडित असणा-या घटकांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे.

कोरोनाचे वादळ जगभर पसरले आहे. सध्या 21 दिवसांचे लॉकडाऊन असल्याने व्यवसाय आणि उद्योगांना कुलुप लागले आहे. मंगल कार्यालय व लॉन्समध्येही शुकशुकाट आहे. एरव्ही एस बी लाँन, होटल जन्नत, बाजोरीया लाँन ईत्यादी गजबजणा-या मंगल कार्यालयांमध्ये कमालीचा सन्नाटा असून, कोरोनापासून खबरदारी म्हणून विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत.

बुकिंग रद्द झाल्याने लाखो रूपयाची उलाढाल ठप्प झाली आहे. याचा थेट फटका विवाह सोहळ्याशी निगडित असणाया अन्य व्यवसायिक व छोट्या घटकांना बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत घरगुती विवाह सोहळे पार पाडण्याचे नियोजन केले जात आहे. मार्चच्या दुस-या पंधरवड्यात असे घरगुती विवाह सोहळे संपन्न झाले.

हरणे कॅटरिंगचे संचालक अरूणराव हरणे म्हणतात की…

लॉकडाउनच्या काळात त्यांचे 20 एप्रीलपर्यंतचे जवळपास 20 आर्डर रद्द झाले. काहींनी समोरच्या तारखा घेतल्या तर काहींना पूर्ण ऍडव्हांस परत करावा लागला. त्यामुळे सिजनच्या सुरूवातीलाच मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. हा फटका केवळ कॅटरिंग व्यवसायिकांनाच नाही तर त्यावर अवलंबून असणारे वाढपी, मजूर इ. यांना ही मोठा फटका बसणार आहे. सध्या कुणी कोरोनामुळे रिस्क घेण्याच्या तयारीत नसल्याने आणखी किती दिवस हे चालेल हे सांगणेही कठिण आहे.

तारखा रद्द झाल्याने अनेक व्यावसायिकांचे नुकसान
कोरोना मुळे विवाह सोहळे पुढे ढकलल्या जात असून, मार्च, एप्रिल व मे महिन्यांमध्ये बुकिंग केलेल्या तारखा रद्द केल्या जात आहेत. यापूर्वी तारीख रद्द झाल्यास अॅडव्हान्स म्हणून जमा केलेल्या रकमेतून 50 टक्के रक्कम मंगल कार्यालय चालक परत देत नसत. तथापि कोरोना आपत्तीमुळे मंगल कार्यालय मालकांना भरलेली पूर्ण रक्कम परत करावी लागत आहे. यामुळे मोठे मंगल कार्यालय चालकांचे मोठे नुकसान होत आहे.

कापड व्यावसायिकांनाही मोठी झळ
वधूवरांपासून ते जवळच्या वहाडी मंडळींसाठी रेडिमेड कपडे खरेदी केली जातात. विवाह सोहळ्यांवर या मार्केटचे मोठे बजेट असते. आहेर म्हणून देण्यात येणा_या साड्या व इतर वस्तू खरेदी रद्द झाल्याने कापड दुकानदार व रेडिमेड कपडे विक्रेते हतबल झाले आहेत.

ग्रामीण भागात घराच्या मंडपामध्येही विवाह सोहळे पार पाडले जातात. ग्रामीण भागातील बहुसंख्य विवाह सोहळे अलिकडे उन्हाळ्यापूर्वीच म्हणजे पाणीटंचाईची झळ बसू नये, म्हणून मार्च, एप्रिलमध्ये पार पाडले जातात. अशा या विवाह सोहळ्यांवर गेले काही दिवस कोरोनाचे संकट उभे ठाकलेले दिसून येत आहे . त्यामुळे रद्द झालेल्या विवाह सोहळ्यांमुळे अनेक यजमानांनाही याचा फटका बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.