गोरज येथील विवाहित तरुण 4 महिन्यानंतरही बेपत्ताच

आढळुन आल्यास माहिती देण्याचे आवाहन

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील गोरज येथील येथील विवाहित तरुण गेल्या 4 महिन्यांपासून बेपत्ता आहे. या बेपत्ता तरुणाचा पोलिसांना अद्यापही सुगावा लागला नसून या तरुणाची माहिती मिळाल्यास त्वरित नातेवाईक अथवा पोलीसांना कळवावे असे आवाहन करण्यात येत आहे.

मारेगाव तालुक्यातील गोरज येथील विजेंद्र नारायण परोधी वय 30 या तरुणाचा मे 2021 मध्ये चोपण येथील एका तरुणीशी विवाह झाला होता. विवाहाच्या काही दिवसानंतर हा तरुण आपल्या बहिणीच्या गावाला गेला. तिथून परत गोरजला न येता बेपत्ता झाला. घरून निघून गेला तेव्हा त्यांच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे शर्ट, पॅन्ट असा पेहराव होता. त्यांचा रंग सावळा, उंची 5 फूट 4 इंच आणि मानेवर चांदणीचे स्टिकर गोंदलेले आहे.

गेल्या 4 महिन्यापासून हा तरुण आपल्या पत्नीला सोडून गेल्याने पत्नी सतत पतीच्या विरहात आहे. घरी कोणत्याही प्रकारचे भांडण,तंटा न झाल्याने आणि एकाएकी घरून निघून गेल्याने घरची सगळी मंडळी चिंतेत आहेत. जर कोणाला या नावाची व अशी व्यक्ती आढळल्यास त्यांनी मारेगाव पोलीस आणि नातेवाईकांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

हे देखील वाचा:

थरार: 45 लाखांच्या दरोड्यातील आरोपीला राजस्थानमधून अटक

स्पायडर मॅन आलाये… ऍक्शन आणि रोमांचसाठी तयार राहा…

 

Comments are closed.