मराठा आरक्षणाबाबत अपेक्षीत निकालच लागला: डॉ. अशोक जिवतोडे

ओबीसी महासंघाचे डॉ. अशोक जिवतोडे यांची प्रतिक्रिया

0

बहुगुणी डेस्क: बहुप्रतिक्षीत मराठा आरक्षणाचा निकाल देत आज (दि.5 मे) ला सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले. केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या मागील सरकारने गायकवाड समितीचा अहवाल मंजूर करुन घेतला व थातुरमातुर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मा. सुप्रीम कोर्टाने गायकवाड अहवालातून मराठा समाजाचे मागासलेपन सिध्द होत नाही व मराठा समाजाला 50% पेक्षा जास्त आरक्षण देणे घटनाबाह्य आहे. असे सांगत मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. यावर अपेक्षीत निकालच लागला अशी ओबीसी महासंघाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे 

सुप्रिम कोर्टाने म्हटले की गायकवाड समितीच्या शिफारसी मान्य नाही, हे घटनेच्या कलम 14 चे उल्लघंन आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही व तशी असाधारण परीस्थिती नाही तथा मराठा समाज मागास आहे, हे सिध्द होत नाही.

        

यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे यांनी हा निकाल आधीच अपेक्षीत होता. यात धक्कादायक असे काही नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी महासंघाने सुरवातीपासूनच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात येवू नये, ही भुमिका मांडली होती व आजही हीच भुमिका कायम आहे. भविष्यात देखील शासनाने मराठा समाजाला ओबिसीत टाकण्याचा प्रयत्न करु नये, अन्यथा फार मोठे आंदोलन उभे केल्या जाईल.असे ही ते म्हणाले.

         

मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते तर विदर्भात मराठा समाज नगण्य असतांना आरक्षण दयावे लागले असते व विदर्भातील ओबीसी तथा ओपन समुदायावर अन्याय झाला असता. त्यामूळे ओबीसी समाजाला सरसकट सर्व जिल्ह्यात 19% आरक्षण दयावे तथा खरोखरच मराठा समाजातील जे लोक मागासले आहेत त्यांना EWS मधून आरक्षण दयावे, असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे यांनी मांडले

.

Leave A Reply

Your email address will not be published.