पावसाच्या दिवसात प्रकल्पाच्या परिसरात साठलेले पाणी वाहून जाण्यासाठी योग्य नियोजन न केल्यामुळे पाणी लगतच्या शेतात वाहून जाते. नुकत्याच झालेल्या पावसात प्रकल्पातील राख मिश्रित पाणी विमल झाडे यांच्या नावे गट क्र. (५६/२) असलेल्या शेतात आले. त्यामुळे कापूस पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या अगोदर सुध्दा अशाच प्रकारचे नुकसान सप्टेंबर २०१६ मध्ये झाले होते. तेव्हा तहसिलदार यांचेकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज केला होता. मंडळ अधिकाऱ्यांनी मोका पाहणी करूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. वारंवार पिकांच्या होणाऱ्या नुकसानीमुळे सदर शेतकरी विधवेच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. म्हणून नुकसान भरपाईसह मुलाला प्रकल्पात नोकरी देण्याची मागणी झाडे यांनी केली आहे.
