विठ्ठलवाडीत गळफास घेऊन आत्महत्या

मृतक रेल्वे विभागातील कर्मचारी

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील विठ्ठलवाडी परिसरात आज मंगळवारी सकाळी 5 वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर व्यक्ती हा रेल्वे मध्ये कर्मचारी असल्याचे कळते. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

संदीप उर्फ बद्री त्रिलोकिनाथ मौर्य (27) रा. उत्तरप्रदेश असे मृतकाचे नाव आहे. तो गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून वणीत रेल्वे विभागात काम करीत होता. वणीत आल्यापासून तो परिसरातील प्रकाश पिंपळकर यांच्या घरी किरायाने राहत होता.

मंगळवारी सकाळी 5 वाजताच्या सरस त्याने आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या 4 ते 5 महिन्यांपूर्वी तो आपल्या मूळ गावी गेला होता. त्यानंतर तो एक आठवड्यापूर्वीच वणीत आपल्या भावासोबत परत आला होता.

आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे आजारपणाला कंटाळून आत्महत्या तर केली नसावी असा अंदाज बांधला जात आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.