कापूस वेकण्यासाठी मजूर भेटत नसल्याने शेतकरी अडचणीत 

उरला सुरला कापूसही मजूर मिळत नसल्याने शेतात

0

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ जिल्हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण हा कापूस उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी आता कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. सुरवातीला या पांढऱ्या सोन्याला 3800 रुपये भाव होता व कापूस वेचणीची मजुरी 7 रुपये प्रति किलो होती. आता भाव वाढले व हा भावात थेट 5000 च्या वर येऊन ठाकला आहे. आता कापूस विकण्याची योग्य वेळ आहे .परंतु वेचणीचा भाव मजुरांच्या कमतरतेमुळे वाढला आहे. सोबतच मजूर मिळत नसल्याने वेचणीचा मागेल तो भाव मिळत आहे. सध्या10 रुपये प्रति किलो भाव मिळूनही मजूर मिळत नसल्याने कापूस आता जमिनीवर पडत आहे व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

बळीराजा हा मोठ्या आशेने कापूस पेरणी करून उत्पन्न होणार म्हणून वाट पाहतो व त्या उत्पनातुन आपल्या मुलांचे शिक्षण, कर्ज फेडता येईल म्हणून दिवसरात्र राबतो. त्यासाठी पिकाला खत ,पाणी देतो पिकांची दिवस रात्र पाहणी करून काहीतरी पदरात पडण्याची वाट पाहतो.त्यातच या वर्षी बोंड अळीने अर्धे पीक नष्ट केले. आता उरले सुरले पीक मिळेल आणि यातून काही उत्पन्न होणार या आशेवर शेतकरी आहे. मात्र मजूर मिळत नसल्याने कापूस शेतातच पडून आहे. काही शेतकरी बाहेगावावरून मजूर आणत आहे. त्यांच्या येण्या जाण्याचा खर्चही शेतकऱ्यांलाच दयावा लागत आहे .शा वेळी के करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकरी हा असा एकमेव व्यावसायिक आहे जो वर्षातून एक किंवा दोनदाच उत्पादन घेऊन वर्षभर आपला खर्च भागवितो. शिवाय हा व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतो. स्वबळावर मेहनत करून मशागत करून काहीतरी फायदा होईल या आशेवर शेतकरी जगत असतो. रात्री शेतमालाची जंगली जनावरांपासून रक्षण करण्यासाठी शेतात जाऊन जागरण करतो .इतके केल्यानंतरही काहीच मिळत नसेल तर शेती करावी की नाही असा प्रश्न  नक्कीच शेतकऱ्यांपुढे उपस्थित राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.