बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धरणे

झरी जामनीच्या भूमिपुत्र एल्गार संघर्ष समिती आयोजन

0

सुशील ओझा, झरी: बियाणे कंपन्यांनी 90 दिवस बोंडअळी येणार नाही असा दावा केलेला असतानासुध्दा जर बोंडअळी ६० – ७०व्या दिवशी पात्याफुलात शिरते. तर हा बियाणे कंपन्याचा दावा निरर्थक आणि शेतकऱ्यांना जमिनीत गाडणारा नाही काय? त्यामुळे भूमिपुत्र एल्गार संघर्ष समितीच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी येथे बोंडअळी नुकसान भरपाई हेक्टरी ४० हजार मिळावे यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व मंगेश पाचभाई यांनी केले आणि अनेक तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

या वर्षीच्या कोरोनाच्या महामारीत अखंड मेहनत घेत महत्वाची भूमिका बजविणारा आपला पोशिंदा शेतकरी. या वर्षीचा पावसाचा अंदाज घेता पर्जन्यमान सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप नुकसान झालंय. सोयाबीनसारखं पीक तर शेतातून काढायचंच काम पडलं नाही.

जागेवरच कोंबं फुटली. आता आशा होती फक्त कपाशीकडून. यवतमाळ जिल्हा सर्वाधिक कपाशीचे पीक घेणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दुष्काळात तेरावा महिना असं म्हटलं जातं. पण आज तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घरीच तेरावा महिना आला आहे.

अतिवृष्टी त्यातल्या त्यात पिकाला लावलेला साधा खर्चही निघाला नाही. अतिवृष्टीपाठोपाठ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्यास कारणीभूत असणाऱ्या बोंड अळीचा उद्रेक जिल्हयात, तालुक्यात मोठया प्रमाणावर दिसतो आहे . २०१७ साली डिसेंबरमध्ये आलेल्या या राक्षसी अळीमुळे शेतकऱ्यांना किमान काहीतरी कापूस झाला होता.

यंदा ही अळी सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयातच पातीत जाऊन बसल्याने आता सगळी बोंडे या अळीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे नागडे वास्तव्य शेतकयांची उरली सुरली आशासुध्दा संपुष्टात आणणारे आहे. सगळया शेतकयानी बी.जी. – २ वाणाची पेरणी केली आहे.

हेदेखील वाचा

नरसाळा येथे दोन अवैध दारूविक्रेत्यांवर धाड

आकाशकंदिलाचा संदर्भ रामायणात, मेसोपोटोमियात आणि बऱ्याच ठिकाणी 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.