अन्नदाता झाला आक्रमक, धडकला तहसील कार्यालयावर..

आमदार प्रतिभाताईंच्या नेतृत्वात निघाला विशाल मोर्चा

बहुगुणी डेस्क, वणी : शेतकरी विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यातही निसर्गानं दगा दिला. त्यामुळं दिवसागणिक शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाकडून त्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने पाहिजे तशी दखल घेतली जात नाही. केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ दिनांक 23 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचा हिताच्या विविध मागण्यांसाठी “शेतकरी आक्रोश मोर्चा” वरोरा-भद्रावती मतदार संघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात वणी तहसील कार्यालयावर धडकला. केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाने शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक, बेरोजगार युवक, लहान व्यावसायिक तथा सामान्य माणूस पुरता भरडला आहे.

आज शेतमालाला भाव नाही, प्रत्येक वस्तूवर अवाजवी कर आकारणी, पडलेले पिकाचे भाव, अनाठायी आयात धोरण, अशी दडपशाही सुरूच आहे. परिणामी ऐनवेळी शेतमालाचे भाव जाणीवपूर्वक पाडण्याचा डाव केंद्र सरकार साधत असल्याचे आरोप या मोर्च्याच्या माध्यमातून काँग्रेसने केला आहे. केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाविरुद्ध शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारीला “शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन वणी विधानसभा काँग्रेस कमिटीने केले. हा “शेतकरी आक्रोश मोर्चा ” रंगनाथ स्वामी मंदिरातून निघाला. गांधी चौक -खाती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने निघत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहचला, इथं जाहीर सभा घेण्यात आली.

या सभेला माजी आमदार वामनराव कासावार व वरोरा-भद्रावती मतदार संघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर, देविदास काळे, संजय खाडे व अरुणा खंडाळकर यांनी संबोधन केले.”शेतकरी आक्रोश मोर्चाचे” नेतृत्व वरोरा-भद्रावती मतदार संघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. या “शेतकरी आक्रोश मोर्चात जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को सोसा.वणी बँकेचे अध्यक्ष संजय खाडे, रंगनाथस्वामी नागरी सह. पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास काळे, माजी नगराध्यक्ष राकेश खुराणा, डॉ.महेंद्र लोढा, नरेंद्र ठाकरे, राजाभाऊ पाथ्रडकर, अरूणाताई खंडाळकर, वणी तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, वणी, झरी, मारेगाव, तालुक्यातील, शेतकरी, शेतमजूर, काँग्रेसचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.