विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

शेलू (चारगाव) येथील घटना

0

विलास ताजने, (मेंढोली):  वणी तालुक्यातील शेलू (चारगाव) येथील शेतकरी रघुनाथ मुके वय (६५) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली.

बुधवारी रघुनाथ हे जनावरांच्या गोठयात जनावर बांधण्यासाठी खुटा गाडत होते. आधीच वायरमधील लिकेजमुळे विज प्रवाह खंडित होऊन टीनेच्या छतात वीज प्रवाह संचारला होता. हातातील सबल छतावरील टीनेला लागताच त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा बराच परिवार आहे. शेलू येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.