तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफीचे अर्ज होत आहे बाद

0

मारेगाव: छ. शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेत बाकी राहलेल्या थकीत शेतकऱ्यांसाठी शासनाने ३१ मार्च २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दिली. मात्र तालुक्यातील शेतकरी जेव्हा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करण्यासाठी जातात त्या वेळी मारेगाव स्टेट बँकेचे नाव येत नाही. त्यामुळे कर्ज माफीची प्रक्रिया जात नसल्याने शेतकरी तांत्रिक अडचणीने त्रस्त झाला आहे.

मोठा गाजावाजा करुन शासनाने छ. शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ न झाल्याचे बोलले जात आहे, शासनाच्या अटी आणि शर्तीत अनेक शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले असुन, ज्या शेतकऱ्याचे अर्ज भरावयाचे आहे त्यांनी ३१ मार्च पर्यंत आपले अर्ज भरुन द्यावे असा आदेश शासनाने काढला आहे. तरी मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रक्रिया करते वेळी मारेगाव येथील स्टेट बँकेचे नाव येत नसल्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया रखडली असल्याची तक्रार शेतकरी करीत आहे.

या संदर्भात तालुक्यातील अनेक शेतकरी मारेगावचे तहसीलदार यांना विचारणा केली असता त्यांनी जिल्हा उपनिबंधक यवतमाळ यांना माहिती देऊन ही तांत्रिक अडचण असलेलं प्रकरण सोडवण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले. तसेच येथील विविध कार्यकरी सोसायटीचे सहकार अधिकारी यांना दुरध्वणी वरुन संपर्क केला असता त्यांचा मोबाईल आउट ऑफ रेंज होता.

आता अवघे दोन दिवस ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुणे तांत्रिक अडचण दुर न झाल्यास शेतकरी हक्काच्या कर्जमाफी योजने पासून वंचित राहल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकर्यानी साधे अर्ज भरुन ज्या ठिकाणी द्यायचे आहे तेथे ३१ मार्चपुर्वी द्यावे जेनेकरुन शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो असे विविध कार्यकारी सोसायटीच्या सुत्राने शेतकर्यांना सुचना केल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.