स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना दिले पाठिंब्याचे पत्र

1

नागेश रायपुरे, मारेगाव: स्वराज्य शेतकरी युवा संघटना मारेगाव यांनी सध्या देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असणारे पत्र महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना गुरुकुंज मोझरी अमरावती येथे दिले.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालावर घाव करणारे तसेच पूर्ण कृषीव्यवस्था उद्ध्वस्त करणारे कृषी विधेयक मंजूर करण्यात आले. या कृषी विधेयकामुळे शेतकरी देशोधडीला जाणार असून यात सर्व प्रकारे शेतकरी पिचले जाणार आहेत.

याविरोधात देशाच्या राजधानीत तसेच देशाच्या विविध भागात आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. मारेगाव येथे नव्यानेच स्थापन झालेल्या स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीनेही या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविणारे पत्र

मारेगाव येथील स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिले. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांची भेट घेत त्यांना या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकर यांच्या नेतृत्त्वात दिले.

यावेळी सचिन पचारे, विशाल किन्हेकर, राजू मांदाडे, अनिल राऊत, सोमेश्वर गेडेकर, सागर खडसे, नीतेश चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

हेदेखील वाचा

पुरुषोत्तम देठे अनंतात विलीन

हेदेखील वाचा

झरी तालुका ग्रामसेवक संघटनेची तालुका कार्यकारणी गठीत

 

 

1 Comment
  1. […] स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचा शेतकरी… […]

Leave A Reply

Your email address will not be published.