युवा शेतक-याने आंब्याच्या झाडाला घेतला गळफास

लग्नासाठी मुलगी बघणेही सुरू होते, मात्र त्याआधीच संपवली जीवनयात्रा

भास्कर राऊत, मारेगाव: वेगाव येथील एका युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घङली. राजेंद्र वामन गौरकार, वय अंदाजे 30 वर्षे असे मृतकाचे नाव आहे. तो शेती करायचा. शुक्रवारी तो नेहमी प्रमाणे रात्री शेतामध्ये जागलीसाठी गेला होता. आज शनिवारी 21 मे रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घरी देखील आला. मात्र त्याच्या मनात काही वेगळेच होते. तो एका तासाने म्हणजे सुमारे 8 वाजताच्या सुमारास पुन्हा शेतात गेला व तिथे जाऊन त्याने त्याचे काका गौरकार यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

काही वेळाने त्याच्या काकाच्या शेतातील सालगडी शेतामध्ये गेला असता त्याला राजेंद्रने आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्याने आरडाओरड करत परिसरातील शेतक-यांना घटनास्थळी बोलवून घेतले व घरच्यांना याची माहिती दिली. घरचे तिथे आले. त्यांनी याची माहिती लगेच मारेगाव पोलिसांना दिली. मारेगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

राजेंद्र हा 30 वर्षाचा तरुण होता आणि लग्नासाठी मुली पाहणेसुद्धा त्याचे सुरु होते. शेतीच्या विवंचनेत तसेच कर्जाच्या बोझ्यामध्ये असल्यामुळे तो विमनस्क स्थितीमध्ये असल्याचे गावात बोलले जात आहे. त्यामुळे कर्जामुळे आत्महत्या केली की आणखी काही वेगळे कारण आहे याचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

वणीतील पट्टाचारा नगर व ढाकोरी बोरी जवळ आढळला मृतदेह

ब्राह्मणी फाट्याजवळ तंबाखू तस्कराला अटक

ड्रेस डिझायनिंग, एम्ब्रायडरी, मेंदी इ. क्लाससाठी प्रवेश सुरू

हॉरर कॉमेडी भुलभुलय्या 2 आज सुजाता थिएटरमध्ये रिलिज

लॉयन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्यु. कॉलेजसाठी प्रवेश सुरू

Comments are closed.